loader
Breaking News
Breaking News
Foto

मविआ अन् मनसेच्या शिष्टमंडळाचं निवडणूक आयोगाला पत्र

दिल्ली - महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) शिष्टमंडळाने दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक आयोगाला चार पानी पत्र सादर केले आहे. या पत्रात नऊ महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले असून, ते मुख्य निवडणूक आयुक्तांना देण्यात आले आहे. या पत्रावर महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील आणि हर्षवर्धन सपकाळ यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळाने यापूर्वी १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी राज्यातील निवडणूक आयोगाची भेट घेतली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र, त्या भेटीनंतर त्यांना कुठल्याही प्रकारचे समाधान मिळाले नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे. राज्यातील निवडणूक आयोगाने यापूर्वी त्यांचे आरोप फेटाळले असल्याने, आता केंद्रीय आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg