loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत रोटरी स्कूलचा अर्णव परकाळे द्वितीय

खेड - (प्रतिनिधी) श्री शिवशंभू विचारमंच, रत्नागिरी यांच्या वतीने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत रोटरी स्कूलचा अर्णव स्वप्निल परकाळे याने व्दितीय क्रमांक पटकावून यश संपादित केले. सदरच्या निबंध स्पर्धेसाठी जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये इयत्ता 8 वी ते 10 वी गटात अर्णव परकाळे याने 'अफजलखान वध व स्वराज्यविस्तार' या विषयावर निबंध लिहून व्दितीय क्रमांक पटकावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिनांक 30 नोव्हेंबर रोजी रोटरी स्कूलमध्ये झालेल्या इतिहास कार्यशाळा कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर भारत इतिहास संशोधन सचिव पांडूरंग बलकवडे यांच्या हस्ते अर्णव याला प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. त्याने प्राप्त केलेल्या या यशामुळे त्याच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी अर्णव याचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg