loader
Breaking News
Breaking News
Foto

कोळंब रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण; ग्रामस्थ आक्रमक

मालवण (प्रतिनिधी) - मालवण- आचरा सागरी महामार्गावरील कोळंब गावातील रस्त्याची खड्ड्यामुळे अक्षरशः चाळण झाली असून अनेक वाहनचालकांचे अपघात होत आहेत. खड्डे बुजविण्या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार लक्ष वेधूनही कार्यवाही होत नसल्याने आज कोळंब पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला जाब विचारला. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने ठेकेदाराकडून उद्या १० डिसेंबर पासून खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र काम सुरु न झाल्यास या मार्गावर रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी कोळंबच्या सरपंच सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर, माजी सरपंच प्रतिमा भोजने, सर्जेकोट- मिर्याबांदा सरपंच नीलिमा परुळेकर, प्रमोद कांडरकर, प्रसाद भोजने, सुरेश लाड, बापू बावकर, विजय भोजने, गणेश कोळंबकर, सुशांत भोजने, पंकज कवटकर, विशाल फणसेकर, उदय आंगणे, दिनेश मेथर, शैलेश प्रभूगांवकर, प्रसाद कामतेकर, सचिन नरे, भाऊ फणसेकर, सुधाकर लाड, मिनेश चव्हाण, चेतन भोजने, उदय आंगणे, प्रशांत सावंत, गणेश आचरेकर, प्रदीप भोजने, हेमंत कामतेकर, श्री.फाटक, महेश फाटक, निलेश भोजने, महेश कदम, संग्राम कासले आदी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg