loader
Breaking News
Breaking News
Foto

दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सज्ज, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हाय अलर्ट

बांदा (प्रतिनिधी) - दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून, महाराष्ट्र-गोवा सीमेलगत असलेल्या पत्रादेवी नाक्यावर कडक तपासणी सुरू आहे. या ठिकाणी येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येक वाहनाची तपशीलवार झडती घेतली जात आहे. वाहनांमध्ये असलेले सामान आणि प्रवासी यांची माहिती पोलिसांकडून नीट तपासली जात आहे. गोवा राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार्‍या वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. दरम्यान, बांदा - पत्रादेवी, या सीमावर्ती भागातही पोलिस बंदोबस्त निगराणी ठेवण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिवस-रात्र संयुक्त पथकांकडून नाकाबंदी करून गस्त सुरू आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर केंद्र आणि राज्य सरकारने सर्व सीमावर्ती जिल्ह्यांना अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस, सीमा सुरक्षा पथक आणि गुप्तचर विभाग हे सर्व हाय अलर्ट वर आले आहेत. स्थानिक नागरिकांनाही सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा हालचाल आढळल्यास लगेचच जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिकार्‍यांकडून करण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेची टीम गोवा येथे दाखल झाली असून तिकडे तपास सुरू असल्याचे समजते. हीच टीम सिंधुदुर्गात विशेषतः सावंतवाडी विभागात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आल्याचे समजते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg