loader
Breaking News
Breaking News
Foto

हर्णे बंदर जेटी कामाला गती देण्याचे आदेश — मंत्री योगेश कदम

संगलट (खेड) ( प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातीलहर्णे बंदर जेटीचे काम हे केवळ विकासाशी संबंधित नसून स्थानिक मासेमार, बोट मालक आणि किनारी भागातील अर्थव्यवस्थेचे जीवनमान उंचावणारा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे हे काम जलद, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री व दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी संबंधित विभागांना दिले. मंत्री कदम यांनी हर्णे बंदर येथील नव्या जेटीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करत चालू कामाचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी स्थानिक नौका मालक, मासेमार आणि ग्रामस्थांनी जेटी परिसरातील विविध अडचणी तातडीने सोडवावयाच्या समस्या मांडल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

"मासेमारांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची' यावर प्रतिक्रिया देताना मंत्री कदम म्हणाले की, मासेमारांची सुरक्षा, बोटींची ये-जा आणि आवश्यक सोयीसुविधा देणे हे प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे. कामात कोणतीही ढिलाई चालणार नाही.” त्यांनी अधिकाऱ्यांना नियोजनपूर्वक, मानक पद्धतीने व वेळेत काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. पाहणीवेळी उपस्थित अधिकारी व मान्यवर:सागर कुवेसकर – सहायक आयुक्त (मत्स्य), रत्नागिरी, मंजुळे – उपअभियंता, बंदर विभाग, रामदास गवार – उपनिरीक्षक, किशोर देसाई – विधानसभा क्षेत्र प्रमुख, उन्मेष राजे – तालुका प्रमुख, सुनील दळवी – सदस्य, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, ऐश्वर्या धाडवे – सरपंच हर्णे, या पाहणीमुळे जेटीचे काम नव्या गतीने आणि अधिक काटेकोर नियोजनाने पुढे नेले जाईल, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg