loader
Breaking News
Breaking News
Foto

आय.सी.एस. महाविद्यालयात उन्नत भारत अभियानाचा वर्धापन दिन साजरा

खेड– येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय. सी. एस. महाविद्यालयात उन्नत भारत अभियानाचा अकरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी, आय.क्यू.ए.सी. चे समन्वयक डॉ. अयुब शेख, उन्नत भारत अभियान महाविद्यालयीन समन्वयक डॉ. राजेंद्र भालेराव, सहसमन्वयक प्रा. विपुल गायकवाड हे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी डॉ. अनिता आवटी यांनी भारताच्या विकासात युवकांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे विशद केले, तसेच ग्रामीण भागाचा विकास झाला तरच खऱ्या अर्थाने भारत विकसित होईल यासाठी उन्नत भारत अभियान हे उच्च शिक्षण संस्थांमध्ये संपूर्ण देशभर राबवले जात आहे व आपल्या महाविद्यालयाने ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमाबद्दल कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

डॉ. राजेंद्र भालेराव यांनी आपल्या प्रास्ताविकात उन्नत भारत अभियानाचे उद्दिष्ट व युवकांची भूमिका यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी डॉ. अयुब शेख यांनी उन्नत भारत अभियानाच्या वर्धापन दिनानिमित्ताने शुभेच्छा देत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपला हातभार लावावा असे आवाहन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. विपुल गायकवाड यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg