loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर तालुक्यात मोठया प्रमाणावर विनापरवाना जंगलतोड, वन विभागाने कठोर कारवाई करण्याची मागणी

संगमेश्वर (प्रतिनिधी) - संगमेश्वर तालुक्यात गेले काही दिवस मोठया प्रमाणावर विना परवाना जंगलतोड सुरु असून अनेक ठिकाणी जंगली वृक्षांच्या लाकडाचे मोठे साठे आडमार्गावर करुन ठेवले असल्याचे निदर्शनास येत आहे. याकडे वन विभागाने गाभीर्याने लक्ष देवून बेसुमार जंगलतोंडीला आळा घालून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी आणि सामान्य जनतेने केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संगमेश्वर तालुक्यात नायरीच्या खोर्‍या पासून अगदी आंबा घाटा पर्यंत सर्वत्र खुलेआम आणि बेसुमार जंगलतोड सुरु आहे. ही जंगलतोड करुन दररोज असंख्य ट्रक भरुन जळाऊ लाकूड पश्चिम महाराष्ट्रात जात असल्याचे पाहायला मिळते. दरवर्षी केल्या जाणार्‍या झाडांच्या लागवडीच्या तुलनेत वन विभाग जळाऊ लाकडाच्या वाहतुकीला परवाने देतात कां ? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

पूर्वी जळाऊ लाकूड ट्रक मध्ये भरुन उघडपणे नेलं जायचं, जळाऊ लाकूड भरुन जाणार्‍या ट्रकची संख्या पाहून नागरीक आणि पर्यावरण प्रेमी अचंबित व्हायचे. आता जळाऊ लाकडाची होणारी वाहतूक उघडपणे दिसू नये म्हणून प्रत्येक ट्रकमधील लाकूड ताडपत्रीने झाकले जाते. सर्व सामान्यांच्या डोळ्यात अशा प्रकारे धूळ फेक केली जात असली तरी, ती निसर्गावर केली जावू शकत नाही. या बेसुमार जंगलतोडीचा फटका पर्यावरणाचा तोल ढासळण्यावर होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg