loader
Breaking News
Breaking News
Foto

वातावरणात गारठा कायम असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात सर्दीची साथ कायम

रत्नागिरी (डिजीटल डेस्क) - हवामान खात्याने कोकण विभागात पावसाचा अंदाज वर्तविला आहे, त्यामुळे सकाळी धुके आणि ढगाळ वातावरण काही भागात दिसून येत आहे. हवामानात मोठा बदल झाला असून वातावरणात गारठा कायम आहे, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र सर्दीची साथ सुरु आहे. ग्रामीण भागात सध्या सर्दी आणि तापसरीचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. तसेच शहरी भागात देखील सर्दीची साथ कायम आहे. गेले १५ दिवस शेकडो रुग्णांनी सर्दीची औषधे खरेदी केली आहेत. खाजगी डॉक्टरांकडे अनेक रुग्णांचे उपचार सुरु आहेत. सरकारी दवाखान्यातून देखील सर्दी,तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आरोग्य विभाग याबाबत दक्ष असून रुग्णांनी वेळीच उपचार केले तर ताप व सर्दी नियंत्रणात येईल, असा विश्वास आरोग्य अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. काळजी करण्यासारखे काहीच नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg