loader
Breaking News
Breaking News
Foto

महापालिका निवडणुकीत मतदारांमध्ये गोंधळ; अनेक ठिकाणी मशिन बंद, आयोगाचा सावळा गोंधळ

मुंबई - राज्यातील सर्वच महानगरपालिकांसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली असली, तरी पहिल्याच तासात निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आयोगाने यापूर्वी घेतलेल्या एकामागून एक निर्णयांमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले असतानाच, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीच मोठ्या प्रमाणावर गैरव्यवस्थेचे चित्र समोर आले. अनेक ठिकाणी मतदार यादीतील नावांचा गोंधळ, ईव्हीएम मशीन बंद पडणे, बटणे काम न करणे अशा तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटींमुळे मतदारांची मोठी हेळसांड झाली. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवडणूक आयोगाच्या या ढिसाळ कारभाराचा पहिला फटका थेट राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनाच बसला. नवी मुंबईत सकाळी साडेसातपासून मतदानासाठी बाहेर पडलेल्या गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबाला एक तास मतदान केंद्रांवर फिरावे लागले. दोन वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर नाव न सापडल्याने संभ्रम निर्माण झाला. अखेर कोपरखैरणे येथील सेंट मेरी हायस्कूलच्या मतदान केंद्रावर गणेश नाईक, संजीव नाईक आणि सून कल्पना नाईक यांची नावे यादीत आढळली. मात्र, माजी महापौर सागर नाईक आणि त्यांच्या पत्नीचे नाव वेगळ्याच ठिकाणी असल्याचे समोर आले. त्यामुळे नेहमी एकाच ठिकाणी मतदान करणार्‍या नाईक कुटुंबाला यावेळी वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर जावे लागले. या प्रकारावरून यंत्रणा ’टू द पॉइंट’ काम करत नसल्याचा गंभीर आरोप गणेश नाईक यांनी केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg