loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबेनळी अपघाताचा मोठा ट्विस्ट समोर, हर्णे येथून शनिवारी रात्री निघालेले तरुण

पोलादपूर - आंबेनळी अपघाताचा मोठा ट्विस्ट समोर आला असून अपघातानंतर तब्बल २४ तास कार कोसळल्याचा थांगपत्ता कुणाला नव्हता. यातील एका मुलाच्या वडिलांनी एकाच मोबाईलवर ५० कॉल केले होते. हा अपघात इतका भीषण होता की, साधारणपणे ८०० फूट खोल स्कॉर्पिओ कोसळली होती. त्यामुळे या कारमधील कुणी वाचण्याची शक्यताच नव्हती. सातारा कोरेगाव तालुक्यातील आसगावमध्ये एकाच रस्त्यावरील ५ तरुण मयत झाल्याने गावात सन्नाटा पसरला आहे. आक्रोश सुरु आहे. हा अपघात शनिवारी घडल्याचे समोर येत आहे. हर्णे बंदरावर मौजमजा करुन हे तरुण गावाकडे निघाले होते. त्यातील रितेशने आपल्या आईला फोन करून मासळी खल्याचे सांगितले, तसचे आम्ही रात्री १० वाजता निघणार असल्याचे सांगितले. रात्री १० वाजता हे ८ मित्र हर्णे येथून सातार्‍याच्या दिशेने निघाले आणि आंबेनळी घाटाच्या वळणात रात्रौ ३ वाजता त्यांची स्कॉर्पिओ ८०० फूट दरीत कोसळली. या अपघाताची माहिती कुणालाच कळणे शक्य नव्हती. जेव्हा मुले घरी आली नाहीत, तेव्हा शोधाशोध सुरु झाली. आणि नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध सुरु केली. आंबेनळी घाटातील काही गावकर्‍यांना या घटनेचा सुगावा लागला. त्यांनी पोलादपूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर ही घटना उघड झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg