loader
Breaking News
Breaking News
Foto

"एक देश एक निवडणूक"२०२९ साठी निवडणूक आयोगाची योजना,केंद्राला ५०० कोटींचे अंदाजपत्रक सादर, नव्या ईव्हीएम मशीन खरेदी करणार!

रत्नागिरी टाइम्स डिजिटल डेस्क: भारताच्या २०२९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी तीन वर्षांपेक्षा कमी कालावधी आहे.निवडणूक आयोगाने एक देश एक निवडणूक घेण्याची तयारी सुरू केली आहे.त्यासाठी नवीन मतदान केंद्र विस्तार, लागणाऱ्या ईव्हीएम मशीन साठी ५०० कोटींचे अंदाजपत्रक निवडणूक आयोगाने केंद्राला सादर केले आहे.मतदान केंद्रांच्या विस्तार नंतर मतदान केंद्राची संख्या १० लाख५३ हजार पेक्षा वाढ होऊन ४६ टक्के होईल,म्हणजे २०२९ मध्ये १५ लाख ३९ हजार इतके मतदान केंद्र असतील.त्यासाठी नव्या ईव्हीएम आणि विवीपीएटी मशीन खरेदी कराव्या लागणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार ५०० कोटी रुपये पेक्षा अधिक खर्च होणार असून ३.५७लाख बॅलेट युनिट आणि १.२५ लाख कंट्रोल युनिट खरेदी करण्याची योजना आहे. २०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची तयारी सुरू असून आंध्रप्रदेश,अरुणाचल प्रदेश,ओडिशा ,सिक्कीम, हरियाणा, झारखंड,महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणूक सोबत घेण्याचे नियोजन सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

आता देशात २४ लाख विविपीएटी मशिन्स आहेत,त्यातील अनेक मशीन दोन वर्षात खराब होतील. यावेळी १२०० मतदारांसाठी एक मतदान केंद्राचे नियोजन अपेक्षित आहे.राष्ट्रीय भंडार आणि निवडणूक नियोजन पाहता ३०.८४ लाख बॅलेट युनिट आणि २१.९२ लाख कंट्रोल युनिटची गरज भासणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg