loader
Breaking News
Breaking News
Foto

पासपोर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा नाहीः विदेश मंत्रालय

नवी दिल्ली - पासपोर्ट भारतीय नागरिकांना दिला जातो. मात्र हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही. पासपोर्ट सेवा दिवसानिमित्त विदेश मत्रालयाने त्याचे स्पष्टीकरण दिले असल्याने आता नागरिकत्व सिद्ध करण्याासाठी पासपोर्ट महत्वाचा भाग नाही. पासपोर्ट भारतीय नागरिकांनाच दिला जातो हे नागरिकत्वाचे पक्के प्रमाण नाही. पासपोर्टचे मुख्यकाम विदेश यात्रा सोपी करणे आहे. ते एक प्रवास दस्ताऐवज आह. नागरिकत्व सिद्ध करणारे देस्ताऐवज नाही. पासपोर्ट ही स्वतःची खासगी संपत्ती होवू शकत नाही. भारत सरकारची संपत्ती आहे. तेव्हा सरकारला वाटेल तेव्हा पासपोर्ट परत घेता येवू शकते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यापूर्वी सवोच्च न्यायालयाने आधारकार्ड नागरिकत्वाचा शेवटचा पुरावा नाही. ती फक्त ओळख आहे. निवडणुक ओळखपत्र देखील नागरिकत्व सिद्ध करण्याचे दस्ताऐवज नाही, ते फक्त ओळख पत्ता आणि मतदानासाठी उपयोगी आहे. जन्म, मातापित्याचे नागरिकत्व हेच प्रमाण राहणार आहे.

टाईम्स स्पेशल

कायद्यानुसार २६ जानेवारी १९५० ते १ जुलै १९८७ दरम्यान जन्मलेल्या व्यक्ती जन्माने भारतीय नागरिक मानल्या जातात. त्यानंतर जन्म झालेल्यांना आई किंवा वडील यांच्या कडे भारतीय नागरिकत्व असले पाहिले. ३ डिसेंबर २००४ नंतर जन्मलेल्यांना नियम आणखी कडक करण्यात आले आहेत. आता आई वडिल भारतीय असतील तर त्यांना नागरिकत्व मिळेल किंवा या दोहोंपैकी एक भारतीय नागरिक असला पाहिले. आता पासपोर्ट तयार करण्याची प्रक्रिया ६ दिवसांत पूर्ण केली जाते. पासपोर्ट केंद्रावर ४५ मिनीटांत काम पूर्ण होते. याशिवाय चिप असलेल्या पासपोर्टचा विस्तार देखील वाढविण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg