loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्जमाफीसाठी शेतकरी बैलावर बसून तहसील कार्यालयात सारेच अचंबित !

चंद्रपूर : आज एक शेतकरी बैलासकट तहसील कार्यालयात पोहोचला आहे, उद्या कदाचित नांगर घेऊनही येईल... कारण त्याच्या वेदना आता शब्दांत मावेनाशा झाल्या आहेत...वर्षानुवर्षे अर्ज दिले, निवेदने दिली, आंदोलने केली... पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षच होत राहिले. कर्जमाफी, पीकविमा, हमीभाव यांसारख्या मूलभूत मागण्यांसाठी जर देशाच्या पोशिंद्याला बैलावर बसून सरकारी दार ठोठवावे लागत असेल, तर ही केवळ आंदोलनाची पद्धत नाही; हा व्यवस्थेविरोधातील आक्रोश म्हटला जात आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चंद्रपूरमधील हा प्रसंग प्रत्येकाच्या मनाला प्रश्न विचारतो – सरकारला जाग नेमकी कधी येणार? शेतकऱ्यांच्या अश्रूंना, त्यांच्या संघर्षाला आणि त्यांच्या जगण्याच्या लढाईला अजून किती काळ दुर्लक्षित केले जाणार? देशाला अन्न देणारा शेतकरी आज न्यायासाठी भटकत असेल, तर ही शेतकऱ्यांची नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेची शोकांतिका आहे... आता शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त ऐकण्याची वेळ संपली आहे... त्यांना न्याय देण्याची, त्यांचे प्रश्न सोडवण्याची वेळ आली आहे! कर्जमाफीसाठी शेतकरी बैलावर बसून तहसील कार्यालयात आल्याने सारेच अचंबित झाले .

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg