loader
Breaking News
Breaking News
Foto

सोलापूर हळहळलं, विहिरीत पिकअप कोसळून 8 भाविकांचा मृत्यू; माळशिरसमधील घटना

सोलापूर : जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. भाविकांना घेऊन जाणारी एक पिकअप गाडी थेट विहिरीत कोसळल्याने तब्बल 8 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात आणि मृतांच्या गावावर शोककळा पसरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील सर्व प्रवासी हे पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी होते. हे सर्व भाविक सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील प्रसिद्ध श्री सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. देवाचे दर्शन घेऊन आनंदाने आपल्या गावाकडे, रांजणीकडे परतत असताना माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावानजीक त्यांच्या पिकअप गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खोल विहिरीत कोसळली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg