loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई–पुणे कॉरिडॉरच्या कनेक्टिंग लिंक वरील व्हॅली ब्रिजवर तीन कारचा साखळी अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

चौक खालापूर प्रतिनिधी : मुंबई–पुणे कॉरिडॉरच्या कनेक्टिंग लिंक मार्गावरील व्हॅली ब्रिज येथे किमी 03/600 या ठिकाणी बुधवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या दरम्यान तीन कारचा साखळी अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसून तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, फॉर्च्यूनर (MH 05 CH 3512), वेरणा (AP 39 LW 9979) आणि कार क्रमांक MH 02 DZ 8640 ही वाहने मुंबईहून पुण्याकडे जात असताना किमी 03/600 वरील व्हॅली ब्रिज परिसरात आली असता हा अपघात घडला. यातील फॉर्च्यूनर कार अचानक तिसऱ्या लेनमध्ये थांबल्याने मागून येणाऱ्या वेरणा कारने तिला धडक दिली. त्यानंतर वेरणा कारच्या मागून येणाऱ्या MH 02 DZ 8640 या कारने वेरणाला धडक दिल्याने साखळी अपघात झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, बोरघाटचे अधिकारी व कर्मचारी तसेच संबंधित यंत्रणांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ मदतकार्य हाती घेत अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला हलवली.या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र यंत्रणांच्या तत्पर कार्यवाहीमुळे वाहतूक लवकरच सुरळीत करण्यात आली. अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.महामार्गावर वाहन चालविताना सुरक्षित अंतर राखणे, अचानक ब्रेक न मारणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg