loader
Breaking News
Breaking News
Foto

लहरी हवामानामुळे भातशेतीचे नियोजन बिघडले, खेड तालुक्यात पेरणी गेली लांबणीवर, बळीराजा चिंतेत

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - अवघ्या दरवर्षी प्रमाणे जून महिन्यात पावसाला सुरू होणार या आशेने खेड तालुक्यातील शेतकरी भात पेरणीच्या तयारीला लागले होते. शेतांची मशागत, बियाण्यांची खरेदी अंतिम टप्प्यात असताना यंदाही बदलत्या पावसाच्या स्वरूपाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. एकेकाळी नियमित आणि सातत्यपूर्ण पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या खेड तालुक्यात आता काही दिवस मुसळधार पाऊस आणि त्यानंतर दीर्घ खंड अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने शेतीचे संपूर्ण गणित बदलले असल्याने पेरणी लांबणीवर गेल्याने बळीराजा संकटात सापडल्याने शेतकरीमोठ्या संकटात सापडला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तालुक्यात काही शेतकरी वर्गाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. विशेषतः भात हे येथील प्रमुख पीक असून त्याची संपूर्ण शेती मान्सूनवर आधारित आहे. पूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होताच शेतकरी नियोजनबद्ध पद्धतीने पेरणी करत असत. जुलै ते सप्टेंबरपर्यंत पडणाऱ्या सातत्यपूर्ण पावसामुळे पिकांना आवश्यक ओलावा मिळत असे. मात्र गेल्या या वर्षात पावसाचा स्वभाव बदलल्याने शेतकऱ्या समोर अनेक नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. तर जून महिना मध्यावर आला असतापावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी राजा देवाकडे साकडे घालत लवकरात लवकर पाऊस पडावा व आम्हाला शेतीची कामे करत आमचे उन्हाळ्यात ओसाड पडलेले माळरान पुन्हा नव्याने हिरवेगार व्हावेत अशी प्रार्थना करत असून पावसाने अशीच दांडी कायम ठेवल्यास खालापुर तालुक्यात भात शेती व्यवसाय मोठ्या संकटात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची किती शेतकरी राजा व्यक्त करत आहे.

टाईम्स स्पेशल

जलसंधारण हाच पर्याय बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पाणी जिरवा, पाणी आडवा या संकल्पनेचे महत्व अधिक वाढले असून प्रत्येक माणसाने स्थानिक भातलावणीच्या वेळापत्रकावर परिणाम बदलत्या हवामानामुळे पावसाच्या आगमनाचा निश्चित अंदाज बांधणे कठीण झाले आहे. अनेकदा सुरुवातीला चांगला पाऊत पडतो, त्यामुळे शेतकरी पेरणी करतात; मात्र त्यानंतर दीर्घ खंड पडल्याने रोपे सुकण्याचा धोका निर्माण होतो. दुसरीकडे, उशिरा पेरणी केल्यास अचानक होणाऱ्या अतिवृष्टीमुळे भातलावणीचे नुकसान होते. यामुळे पारंपरिक शेतीचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज घेऊन निर्णय घ्यावे लागत आहेत. वाढत्या अनिश्चिततेमुळे शेतीचा खर्चही वाढत आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg