loader
Breaking News
Breaking News
Foto

एअर इंडियाचे दिल्ली ते अमृतसर विमान मार्ग चुकल्याने पाकिस्तानच्या हवाईक्षेत्रात..

नवी दिल्ली - एअर इंडियाचे विमान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिल्लीहून अमृतसरसाठी निघालेले विमान ज्यामध्ये २००हून अधिक प्रवासी होते. विमान अमृतसर ला पोहोचण्याऐवजी लाहोरला वळवण्यात आलो. आपण पाकिस्तानात आहे कळताच त्यांनी युटर्न घेतला. ही घटना २२ जून रात्री अशीरा घडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एअर इंडियाचे एआय -४७९ हे विमान सोमवारी रात्री सुमारे ९.१५ वाजता दिल्ली विमानतळावरुन अमृतसर विमानतळासाठी निघाले. अमृतसरला उतरण्योएवजी विमान पाकिस्तानी हवाईक्षेत्रात शिरले. फक्त शिरलेच नव्हे तर लाहोरला पोहोचलेही. त्यावेळी आपण पाकिस्तानला पोहोचलो आहोत हे वैमानिकाच्या लक्षात आले नाही. जेव्हा लाहोर एटीसीने एअर इंडियाच्या विमानचालकाशी संपर्क साधून तुम्ही भारताच्या नव्हे तर पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात आहात. तेव्हा वैमानिकाने एअर इंडियाचे विमान माघारी फिरविले. त्यानंतर अमृतसर येथे विमान उतरवण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे पुन्हा विमान दिल्लीला आणण्यात आले. दिल्लीत विमान रात्री १ वाजता पोहोचले. त्यानंतर पुन्हा अमृतसरकडे विमान रवाना झाले. वैमानिकाने खराब हवामान असल्यामुळे मार्गात अडथळा आल्याचा अहवाल दिला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg