loader
Breaking News
Breaking News
Foto

पुढील 5 दिवस वाहणार वेगवान वारे; हवामान विभागाकडून मच्छिमारांना सतर्कतेच्या सूचना!

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई शहर जिल्ह्यातील मच्छिमारांना पुढील पाच दिवसांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे. 26 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत दक्षिण अरबी समुद्र आणि आसपासच्या समुद्रक्षेत्रात हवामान प्रतिकूल राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विशेषतः केरळ किनारपट्टी, लक्षद्वीप, मालदीव परिसर, कोमोरिन क्षेत्र आणि मन्नारचे आखात या भागात वाऱ्याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे IMD ने स्पष्ट केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व किनारपट्टी भागातील मच्छिमारांना पुढील पाच दिवस समुद्रात न उतरण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. आधीच समुद्रात गेलेल्या नौकांनी सुरक्षित बंदरात परत यावे, तसेच हवामान विभागाने जारी केलेले नियमित अपडेट्स तपासत राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मच्छिमारांनी सुरक्षिततेस प्राधान्य देणे अत्यावश्यक असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे. बदलत्या हवामानामुळे समुद्रातील परिस्थिती अचानक बदलू शकते, त्यामुळे सतर्कता आणि सावधगिरी हा सर्वोत्तम पर्याय असल्याचेही IMD ने सांगितले. स्थानिक प्रशासनानेही किनारी भागात सूचना प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे.मच्छिमार बांधवांनी अधिकृत मार्गदर्शनाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg