loader
Breaking News
Breaking News
Foto

नाशिकमध्ये कार थेट विहिरीत कोसळली, मुलांसह 9 ठार

नाशिक - नाशिक येथील दिंडोरीमध्ये एक भयानक दुर्घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणारी चारचाकी गाडी विहीरीत कोसळून भीषण अपघात झाला.ईरटीका गाडी आणि त्यातील 9 जण विहीरीत कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील 9 जणांना काळाने घाला घातल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. मिळालेल्या माहितीनुसार अपघातातील सर्व लोकं हे दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील रहिवासी होते. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या कारमध्ये 3 ते 4 लहान मुलांचाही समावेश असल्याचा अंदाज आहे. हा दुर्दैवी अपघात नेमका कशामुळे झाला ते अद्याप समजू शकलेलं नाही. अपघातीच माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतसी, अपघातस्थळी मोठा जमाव जमला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कारमधील प्रवासी हे एक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आनंदात आटोपून घरी परत येत होते. मात्र एक क्षणात होत्याचं नव्हतं झालं, काळाने या कुटुंबावर झडप घातली आणि 9 जणांचा बळी गेला. ही कार अनियंत्रित होऊन रस्त्याशेजारील विहिरीत कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अपघातानंतर काल रात्री उशिरापर्यंत स्थानिक नागरिक व प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू होतं. 9 मृत नागरिकांपैकी 5 जणांची ओळख समोर आली आहे. – सुनील दत्तू दरगोडे, राखी सुनील दरगोडे, उषा अनिल दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे श्रावणी अनिल दरगोडे अशी मृतांची नावं असल्याचं समजते. या अपघातातील सर्व जण हे दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील रहिवासी असल्याचेही समजते. मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी शहरात MH15-JS-1053 हा क्रमांक असलेली कार शिवाजी नगर येथे राजू राजे यांच्या विहिरीत कोसळली. अपघातानंतर स्थानिक नागरिक व प्रशासनाने धाव घेत बचाव कार्य सुरु केलं. अथक प्रयत्नांती अपघातातील कार क्रेनच्या साहाय्याने विहिरीतून बाहेर काढण्यात आली असता, त्यामध्ये कारमध्ये एकूण नऊ जण असल्याची माहिती मिळाली असून सर्वांचा मृत्यू झाला आहे.

टाईम्स स्पेशल

सुनील दरगोडे व त्यांच्या कुटुंबातील लोकं, तसेच इतर नातेवाईक हे एका कार्यक्रमावरून परत येत होते. सर्वजण आनंदात गप्पा मारत, हसतखेलत हा प्रवास करत होते, मात्र तोच प्रवास त्यांचा अखेरचा ठरला. पण वाटेतच चालकाचा गाडीवरील ताबा सुटला असावा आणि भरधाव वेगाने पळणरी कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या, पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत कोसळली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. रात्री खूप अंधार असल्याने व विहीर पाण्याने भरलेली असल्यामुळे कार व अडकलेले लोक बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. एकाच कुटुंबातील नागरिकांचा मृत्यू झाल्याने इंदोरे गावावर शोककळा पसरल आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg