loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणमध्ये सलग दुसर्‍या दिवशी भटक्या कुत्र्यांचा हल्ला, युवक जखमी

चिपळूण (वार्ताहर) - शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून सलग दोन दिवसांत दोन धक्कादायक घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित यंत्रणांनी तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. शहरातील खेंड विभागात राहणार्‍या कुमार साहिल सचिन लकेश्री याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्‌यातून स्वतःचा बचाव करताना तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. अचानक झालेल्या या हल्ल्‌यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, यापूर्वीच गुरूवारी पेठमाप तांबटवाडी येथे एका विद्यार्थिनीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. कुत्र्यांपासून स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात ती मुलगी गटारात पडून जखमी झाली. ही घटना ताजी असतानाच दुसर्‍याच दिवशी शुक्रवारी पुन्हा अशाच प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. स्थानिक रहिवाशांच्या मते, शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून सकाळी शाळा-कॉलेजला जाणार्‍या विद्यार्थ्यांना, तसेच कामावर जाणार्‍या नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून जावे लागत आहे. विशेषतः खेंड, पेठमाप आणि आसपासच्या भागात कुत्र्यांचे टोळके फिरत असल्याचे नागरिक सांगत आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न केवळ त्रासदायक नसून तो आता सुरक्षेचा गंभीर विषय बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळ न दवडता यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी शहरातून होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg