loader
Breaking News
Breaking News
Foto

..... आणि कोयना धरणात अनेक घरांचे चौथरे दिसू लागले.

पाटण - कोयना धरणासाठी अनेक गावांना विस्थापित व्हावे लागले. गावेच्या गावे रायगड, सांगली, रत्नागिरी या जिल्हयांत विस्थापित झाले. जेथे लोेकांची घरे होती त्या वस्त्यांतील घरांचे चौथरे पाण्याखाली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र आता पाणी ओसरल्याने घरांचे चौथरे दिसू लागले आहेत. इतकेच काय तर मंदिर देखील धरणाच्या पाण्यात बुडाल्याचेही दृश्य दिसत आहे. आपले गांव सोडून विस्थापित झालेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांना आजही न्याय मिळालेला नाही. पुर्वजांच्या आठवणी कोयना धरणात दिसत असून अनेक प्रकल्पग्रस्त या ठिकाणी येवून भेटी देत आहेत. आपल्या आजोबा, पणजोबांचे घर या ठिकाणी होते. आपल्या गावचे मंदिर या ठिकाणी होते. आज जे काही अतिक्रमण विरोधात आवाज उठवितात त्यांनी कोयना धरणात बुडालेल्या गावांचा दौरा एकदा करावा. लोकांना पाणी मिळावे म्हणून गावेच्या गावे प्रकल्पग्रस्त झाली. त्यांचे देशासाठीचे योगदान एकदा जनतेने पहायला हवे. जायचेच असेल तर पर्यटनासाठी कोयना धरण परिसरात जावे असे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg