loader
Breaking News
Breaking News
Foto

विरोधक निवडणुकांवर बहिष्कार टाकणार? संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. 17 जागांपैकी 5 जागा बिनविरोध झाल्या आहेत. सत्ताधाऱ्यांनी आपल्या पक्षातील बंडखोरांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडलेच. पण विरोधी पक्षाच्या उमेदवारांनाही अर्ज घेण्यास भाग पाडले आहे. या निवडणुकीत मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे निवडणुकांवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा विचार बोलून दाखवला आहे. राऊत यांनी राज ठाकरे यांच्या या मताशी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे विरोधक आगामी काळात निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा विचार करणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संजय राऊत यांनी काल राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे पत्रकारांनी राऊत यांना या भेटीतील चर्चेचा तपशील विचारला. त्यावेळी राऊत यांनी हे भाष्य केलं. मी राज ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर गप्पा मारल्या. या सर्व अराजकीय गप्पा होत्या. राज ठाकरे यांच्याकडे साहित्य, संस्कृती आणि पर्यटन याची माहिती असते. त्यांच्याशी आपण या विषयावर उत्तम संवाद साधू शकतो. मीही काल त्यांच्याशी या विषयावर दिलखुलास गप्पा मारल्या, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg