loader
Breaking News
Breaking News
Foto

देशात मोठया राजकीय हालचाली ,राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार आणि तृणमुल कॉंग्रेस या पक्षांचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण होणार

नवी दिल्ली देशपातळीवर मोठया राजकीय हालचाली सुरू असून राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि तृणमुल कॉंगे्रस हे पक्ष कॉंगे्रसमध्ये विसर्जित होणार आहेत. या दृष्टीने गेले दोन दिवस जोरदार राजकीय हालचालींना वेग आला आहे. हे दोन पक्ष कॉंगे्रसमध्ये आल्यास कॉंगेसची शक्ती वाढणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

असे म्हटले जाते कि , हे पक्ष इंडिया आघाडी म्हणून याधीही एकत्र लढतच होते, पण त्यांना तितकासा फायदा झाला नाही. या प्रश्नावर आसबे म्हणाले, "आघाडी म्हणून लढणं वेगळं आणि एक पक्ष म्हणून लढणं वेगळं. आघाडी ही समविचारी पक्षांची होऊ शकते. पण एकाच विचाराचे पक्ष जर एकत्र आले तर त्यांची ताकद वाढते. या दोन्ही पक्षांची वैचारिक मतं तशीही वेगळी नाहीत. त्यामुळे भाजपपुढे आव्हान उभे करायचं असेल तर ते एकत्र येऊ शकतात. हा विलीनीकरणाचा विचार सकारात्मक राजकारणाचा भाग आहे. आगामी निवडणुकीतही काँग्रेसची ताकद यामुळे वाढेल. यामुळे राज्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांना हुरूप येईल. त्यांना लढायला बळ मिळेल. "महाराष्ट्रात राष्ट्रवादी फुटलेली आहे, तिकडे बंगालमध्येही तृणमूल फुटीच्या उंबरठ्यावर आहे. दोन्ही पक्ष कमकुवत स्थितीत असताना काँग्रेसमध्ये विलीनी झाल्यास कितपत प्रभाव पडेल? या प्रश्नावर आसबे म्हणाले की, "दोन्ही पक्ष जर विलीन झाले तर निश्चितच काँग्रेसची ताकद वाढेल. एवढंच नाही तर अजित पवार गटातील नेते सोडा पण वैचारिक भूमिका असलेले कार्यकर्ते तरी तिकडे जातील. तूर्तास ही सकारात्मक चर्चा आहे, त्यांचं विलीनीकरण होईल किंवा न होईल, हे पाहावं लागेल."

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg