loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरातील सर्व्हिस रोडवर खड्यांचे साम्राज्य, खड्यांचा अंदाज मिळत नसल्याने अपघाताची भिती

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा शहरातून जाणा-या सर्व्हिस रस्त्यावर पहील्याच पावसात गुडगाभर खड्डे पडले आहे. त्या खडयांत पावसाचे पाणी साचत असल्याने खड्याचा अंदाज वहान चालकांना येत नाही, परिणामी वहाने जोरात आदळत असून अपघाताची भिती वाहन धारकांतून व्यक्त केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून सर्व्हिस रस्ता सुस्थित नसल्यामुळे वाहनधारक, पादचार्‍यांना त्रास सोसावा लागत असल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेली पंधरा वर्ष सुरू आहे. सुरूवातीस पक्का सर्व्हिस रस्ता तयार न करताच रस्त्याचे कामाला सुरुवात करण्यात आली. रस्ता कामाच्या खोदाईमुळे दुरावस्था झालेल्या रस्त्यावरून वहाने चालविणे भाग पडत होते. आता महामार्ग तसेच शहरातील उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तरीही शहरातील सर्व्हिस रस्ता पक्का मजबुतीसह पूर्ण होताना दिसून येत नाही. तयार केलेल्या रस्त्यावर खड्याचे साम्राज्य पसरले आहे. पहिल्याच पावसात रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत.

टाईम्स स्पेशल

लांजा शहरातील रस्त्याच्या दुतर्फा बांधण्यात आलेली गटारे साफ नाहीत. गटारांमध्ये माती साचल्याने पाणीही वाहून जाण्यासाठी अडथळा होत आहे. गेली पंधरा वर्ष महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे, मात्र तरीही कामे अर्धवट स्थितीत असुन कामांचा दर्जा दिसून येत नाही. बरीच वर्ष काम लांबल्यामुळे महामार्ग चौपदरीकरणाचे काम पुर्ण करण्यासाठी घाईगडबडीत काम उरकण्याच्या मनस्थितीत संबधित यंत्रणेकडून काम केले जात असल्याची नाराजी जनतेतून व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg