loader
Breaking News
Breaking News
Foto

'दोन अपत्य' अटीवर सर्वोच्च न्यायालयाचे गंभीर प्रश्न, हा लोकसंख्या नियंत्रणाचा प्रभावी मार्ग असल्याचे ठोस पुरावे आवश्यक

बुलढाणा जिल्ह्यातील माजी सरपंच मंगला इंगळे यांच्या अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागू असलेल्या ‘दोन अपत्य’ अटीबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. उमेदवारांना केवळ दोन अपत्यांची अट घालण्याच्या नियमाच्या उपयुक्ततेवर न्यायालयाने प्रश्न उपस्थित करत, हा नियम आजच्या परिस्थितीत कितपत योग्य आहे, याबाबत चिंता व्यक्त केली.खंडपीठाने सुनावणीदरम्यान म्हटले की, लोकसंख्या नियंत्रणासाठी अशा प्रकारची अट प्रभावी उपाय आहे का, याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. केवळ दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याच्या कारणावरून लोकप्रतिनिधींना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवणे हा लोकशाही हक्कांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा असल्याचेही न्यायालयाने सूचित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अपत्यांच्या अटीच्या आधारे अपात्र ठरविण्यात आले होते. या निर्णयाला आव्हान देत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने संबंधित कायद्याच्या उद्देश आणि परिणामांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले.सुनावणीदरम्यान न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, दोन अपत्यांची अट हा लोकसंख्या नियंत्रणाचा प्रभावी मार्ग असल्याचे ठोस पुरावे आवश्यक आहेत.बदललेल्या सामाजिक आणि लोकसंख्याशास्त्रीय परिस्थितीत अशा तरतुदींचा फेरविचार होण्याची गरज असू शकते.न्यायालयाने अद्याप अंतिम निकाल दिलेला नाही. सध्या ही सुनावणी सुरू असून, खंडपीठाने केवळ प्राथमिक स्वरूपाची निरीक्षणे आणि प्रश्न उपस्थित केले आहेत.

टाइम्स स्पेशल

महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना दोनपेक्षा अधिक अपत्ये नसावीत, अशी अट संबंधित कायद्यांतर्गत करण्यात आली आहे. या अटीचा उद्देश लोकसंख्या नियंत्रणाला प्रोत्साहन देणे असा सांगितला जातो. मात्र, या नियमावर अनेक वर्षांपासून सामाजिक, कायदेशीर आणि घटनात्मक पातळीवर चर्चा सुरू आहे.मंगला इंगळे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील अंतिम निर्णय केवळ संबंधित याचिकेसाठीच नव्हे, तर ग्रामपंचायत निवडणुकांमधील ‘दोन अपत्य’ अटीच्या भवितव्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरू शकतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg