loader
Breaking News
Breaking News
Foto

केळशी आतगाव येथील गौरीच्या तळ्याजवळ विहिरीलगत मद्याच्या बाटल्यांचा थर; नागरिकांमध्ये संताप

केळशी, (प्रतिनिधी) : आतगाव येथील गौरीच्या तळ्याजवळ असलेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीलगत मद्याच्या रिकाम्या बाटल्या आणि इतर कचरा आढळून आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही विहीर गावातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा स्रोत असल्याने अशा प्रकारामुळे परिसराच्या स्वच्छतेचा आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक पाण्याच्या स्रोताच्या परिसरात अशा प्रकारे कचरा व मद्याच्या बाटल्या पडून राहणे अत्यंत निष्काळजीपणाचे असून यामुळे परिसराचे सौंदर्यही खराब होत आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाने तातडीने या परिसराची स्वच्छता करावी, आवश्यक सूचना फलक लावावेत, नियमित देखरेख करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg