loader
Breaking News
Breaking News
Foto

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेती लावण्याची कामे खोळंबली

वैभववाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भात शेती लावण्याची कामे खोळंबली आहेत व लावलेल्या भात शेतीमध्ये जमिनीला भेगा जाऊन भात रोपे मरत आहेत. त्यामुळे परत लागवड करावी लागते की काय अशी शेतकऱ्यांना भीती निर्माण झाली आहे. कोकणा सध्या विदर्भ मराठवाडडया सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेली आठ दिवस पावसाने दडी मारल्यामुळे भात शेतीची कामे खोळंबली. भाताची रोपे काढून सुखद आहेत तर लागवड केलेली रोपांच्या जमिनीमध्ये जमिनीला भेगा जाऊन रोप मरायला लागल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पाऊस कधी पडणार याकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे. जर ही केलेली लागवड पूर्ण मेली तर परत लागवड करावी लागते की काय अशी चिंता शेतकऱ्याला पडली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरवर्षी जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडायचा यावर्षी पावसाने फक्त सुरुवात केली आणि दडी मारली. त्यानंतर त्यांनी तो पाऊस जूनच्या शेवटी आणि जुलै च्या सुरुवातीला एक चार दिवस पडला. पाऊस पडायला सुरुवात झाल्यावर शेतकऱ्यांनी भात रोप लागवडीला सुरुवात केली. चार दिवस पाऊस पडला पाचव्या दिवशी पावसाने उघडीक घेतली आणि ती पासून आज आठ दिवस पाऊस न पडल्याने लागवडीसाठी काढलेली रोप सुकून जात आहेत. तर लागवड केलेली रोपे या जमिनीला भेगा जाऊन रोपे मरायला लागल्याने शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाला आहे. यामुळे यावर्षी कोकणात दुष्काळ पडतो की काय अशी चिंता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg