loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी, राजापुरात ग्रीन स्टील महाप्रकल्प तर रत्नागिरीत सी प्लेन, डिफेन्स शिपयार्डपाठोपाठ सेमी कंडक्टर प्रकल्प

रत्नागिरी, १७ जुलै (किशोर मोरे) ः रत्नागिरी जिल्ह्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीला प्रचंड गती देणार्‍या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. यामध्ये प्रामुख्याने ७,५०० कोटी रुपयांचा ’ग्रीन स्टील’ महाप्रकल्प सुरू होत असून या प्रकल्पाचे दोन भाग आहेत. त्यातील एक प्रकल्प राजापूरमध्ये तर दुसरा प्रकल्प रत्नागिरीमध्ये सुरू होत असल्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकल्पांसोबतच रत्नागिरीत लवकरच ‘सी प्लेन’ सेवाही सुरू करत असल्याची घेाषणा त्यांनी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी गुरूवारी या सार्‍या प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. कोेकणच्या निसर्गसंपन्न किनारपट्टीचा आणि भौगोलिक परिस्थितीचा हुशारीने वापर करून जिल्ह्यात पर्यटन, संरक्षण, ऊर्जा आणि स्टील क्षेत्राशी संबंधित महाप्रकल्प आणण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतला असल्याची घोषणा त्यांनी केली. या नवीन उद्योगांमुळे रत्नागिरी जिल्ह्याला केवळ मोठी गुंतवणूकच मिळणार नाही, तर स्थानिक पातळीवर हजारो हातांना रोजगार मिळून जिल्ह्याचे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. रत्नागिरीच्या विकासाला चालना देणारे पाऊल उद्योगमंत्र्यांनी उचलल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे. यामुळे रत्नागिरी आगामी काळात महाराष्ट्रातील एक प्रमुख औद्योगिक आणि पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल असा विश्‍वास व्यक्त होत आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये जिल्ह्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा ठरणारा ७,५०० कोटी रुपयांचा ‘ग्रीन स्टील’ महाप्रकल्प लवकरच सुरू होत आहे. स्टील क्षेत्रातील नामांकित उद्योजकांनी रत्नागिरीत ही गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली असून, या प्रकल्पाचे दोन भाग असणार आहेत. यातील एक प्रकल्प राजापूर येथे तर दुसरा प्रकल्प रत्नागिरीमध्ये उभारला जाणार आहे. हा प्रकल्प जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचा मुख्य कणा ठरणार आहे.

टाइम्स स्पेशल

औद्योगिक विकासासोबतच रत्नागिरीच्या पर्यटनाला आधुनिकतेची नवी भरारी देण्यासाठी ‘सी-प्लेन’ सेवा सुरू करण्यात येत आहे. पुढील वर्षभरात ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे उद्दिष्ट असून, संरक्षण क्षेत्रात मोठे नाव असलेल्या ’गणेश शिपयार्ड’च्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जाण्याची शक्यता आहे. या जलद आणि आकर्षक हवाई प्रवासाच्या सुविधेमुळे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणे शक्य होणार आहे.रत्नागिरीच्या समुद्रकिनार्‍याचा वापर करून वाटद किंवा त्याच्या आसपासच्या परिसरात ’डिफेन्स शिपयार्ड’ म्हणजेच संरक्षण जहाज बांधणी केंद्र उभारण्यात येणार आहे. येथे संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असणारी अत्याधुनिक यंत्रणा व सिस्टीम तयार केली जाईल. यासोबतच, सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी ’गेम चेंजर’ ठरणारा सीएनजी प्रकल्पही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे स्थानिक लोकांना पर्यावरणपूरक आणि स्वस्त इंधनाचा उत्तम पर्याय उपलब्ध होईल, असा विश्‍वास ना. सामंत यांनी व्यक्त केला. दरम्यान, पूर्वी मंजूर झालेल्या ’व्हीआयटी सेमीकंडक्टर’ प्रकल्पाबाबत बोलताना उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी सांगितले की, अमेरिकेसोबत झालेल्या काही करारांमुळे या प्रकल्पाला काहीसा उशीर झाला आहे. तसेच या प्रकल्पाचे एकूण मूल्य जे आधी ३८,००० कोटी रुपये होते, ते आता काही प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पाची अडचण लक्षात घेता, त्यांना आवश्यक तेवढीच जागा दिली जाईल आणि उर्वरित शिल्लक जागा इतर नवीन उद्योगांना उपलब्ध करून देण्यात येईल, जेणेकरून रत्नागिरीत नवीन उद्योगांना अधिक वाव मिळेल. एकूणच उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी जाहीर केलेले हे निर्णय रत्नागिरीच्या विकासाला सोन्याचे दिवस आणणारे ठरणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg