loader
Breaking News
Breaking News
Foto

रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळण्यासाठी मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार

मुंबई : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळावी आणि आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांचा शाश्वत विकास व्हावा, यादृष्टीने मंत्रालयीन दालनात एक महत्त्वपूर्ण बैठक मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने मौजे आरावी (ता. श्रीवर्धन) येथील बीच सुशोभीकरण तसेच श्रीवर्धन बीचला 'ब्लू फ्लॅग' मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रायगड किनाऱ्याला जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी हे प्रकल्प महत्वाचे ठरणार आहेत. ही सर्व विकासकामे दर्जेदार, ठरवून दिलेल्या वेळेत आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने पूर्ण करून पर्यटकांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित यंत्रणांना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या आहेत. आपल्या रायगडचे वैभव जागतिक नकाशावर अधिक ठळक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे या वेळी मंत्री तटकरे यांनी सांगितले .

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg