loader
Breaking News
Breaking News
Foto

एसटी प्रशासनाचा मनमानी कारभार; संतप्त विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी तुरळ फाट्यावर रोखली बस!

संगमेश्वर /प्रतिनिधी : संगमेश्वर तालुक्यात एसटी प्रशासनाच्या मनमानी आणि बेजबाबदार कारभारामुळे प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमेश्वरहून कडवई मार्गे करजुवे जाणारी एसटी बस गेल्या ४ ते ५ दिवसांपासून तिच्या ठरलेल्या मार्गावरून म्हणजे किंजळकर वाडी मार्गेव न जाता थेट जात असल्याने या मार्गवरील विद्यार्थ्यना पायपीट करावी लागत आहे .आज, गुरुवारी संतप्त विद्यार्थी, ग्रामस्थ आणि प्रवाशांनी कडवई रेल्वे ब्रिज येथे एसटी बस रोखून धरली. अखेर या प्रकरणात जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी घटनास्थळी उपस्थित नसतानाही, माहिती मिळताच थेट एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून कडक शब्दांत जाब विचारला. त्यांच्या या मध्यस्थीनंतर ही बस पूर्ववत मार्गावर सोडण्यात आली.संगमेश्वरहून कडवई मार्गे करजुवे जाणारी एसटी बस किंजळकरवाडी तसेच ओकटेवाडी मार्गे जाते. या भागातील शालेय विद्यार्थी व कॉलेज युवक कडवई येथील शाळेत जाण्यासाठी पूर्णपणे याच एसटी बसवर अवलंबून आहेत. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून ही बस किंजळकरवाडी आणि ओकटेवाडी या ठरलेल्या मार्गांवर न जाता थेट कडवई येथे जात होती. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे तर हाल होतच होते, पण शालेय विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत होते. विद्यार्थ्यांना मोठी पायपीट करावी लागत होती, तर काहींना पदरचे पैसे खर्च करून खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नेहमीप्रमाणे आज गुरुवारी देखील ही बस तुरळ फाट्यावर आली असता, तेथे उपस्थित असलेले शालेय विद्यार्थी, प्रवाशी आणि ग्रामस्थांनी गाडी थांबवली. त्यांनी चालक आणि वाहकाला ही बस नेहमीप्रमाणे किंजळकरवाडी व ओकटेवाडी मार्गे नेण्याची नम्र विनंती केली. मात्र, चालक-वाहकांनी याला साफ नकार दिला. चालक- वाहकांच्या या भूमिकेमुळे उपस्थित ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी आक्रमक पाऊल उचलत एसटी बस पुढे जाऊ दिली नाही.

टाइम्स स्पेशल

या प्रकाराची, विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाची आणि हालाची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी तात्काळ या विषयाची गंभीर दखल घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून थेट एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोबाईलवरून कॉल केला. "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि सामान्य प्रवाशांची अडवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, बस तात्काळ ठरलेल्या मार्गानेच गेली पाहिजे," अशा कडक आणि रोकठोक शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. संतोष थेराडे यांच्या या आक्रमक फोननंतर एसटी प्रशासनाने तात्काळ नमते घेतले. अधिकाऱ्यांनी तातडीने चालक-वाहकांना सूचना दिल्यानंतर अखेर ती बस किंजळकरवाडी आणि ओकटेवाडी मार्गावर रवाना करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg