loader
Breaking News
Breaking News
Foto

पावसाअभावी केळशीत पंपाच्या पाण्यावर भात लागवड

केळशी (मंगेश पाटील) - दापोली तालुक्यातील केळशी गावात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांसमोर भात लागवडीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. नियमित पाऊस न पडल्याने अनेक शेतकऱ्यांनी विहिरी, बोअरवेल व इतर जलस्रोतांतील पाणी पंपाच्या साहाय्याने शेतात सोडून भात लागवड सुरू केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरवर्षी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असलेली भात शेती यंदा पावसाअभावी अडचणीत आली आहे. पंपाद्वारे पाणी उचलावे लागत असल्याने शेतकऱ्यांचा वीज व इंधनावरील खर्च वाढला असून उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. जर लवकरच समाधानकारक पाऊस झाला नाही, तर भात पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हवामान अनुकूल होऊन लवकरच चांगला पाऊस पडावा, अशी अपेक्षा केळशी परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg