loader
Breaking News
Breaking News
Foto

मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी कोणी तयार असेल तर त्या संस्थांनी पुढे यावे - नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे

रत्नागिरी, : रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी होत असताना मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडविण्याच्यादृष्टी आमचा प्रयत्न सुरू आहे. या गुरांचा उपद्रव वाढला आहे. त्यासाठी चार वेळा निविदा मागविण्यात आल्या, परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. मोकाट गुरे पकडण्यासाठी कोणी तयार असले तर त्या संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी केले आहे. शहरात मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनत आहे. एका संस्थेने केलेल्या पाहणीमध्ये शहरात साडे चारशे ते पाचशे गुरं असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी काही जखमी गुरांवर पालिकेच्या चंपक मैदानावरील निवारा केंद्रामध्ये उचार सुरू आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परंतु इतर गुरे पकडण्यासाठी एकही संस्था पुढे येत नाही. परिणामी गुरांचा उपद्रव वाढताना दिसत आहे. शहरातील एका भागात नागरिकांना त्रास देणार्‍या पिसाळलेल्या बैलाचा आणि मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेच्या कर्मचार्‍यांनी वनविभागाच्या मदतीने विशेष मोहीम राबवली. रात्री साडेबारा वाजेपर्यंत कर्मचारी या जनावरांना पकडण्यासाठी रस्त्यावर होते. वनविभागाच्या पथकाने ट्रँक्युलायझर गनचा वापर करून संबंधित पिसाळलेल्या बैलाला दोन इंजेक्शन देऊन यशस्वीरीत्या ताब्यात घेतले.

टाईम्स स्पेशल

सध्या पुढील कारवाई सुरू आहे. नगर परिषदेचे कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी रात्री-अपरात्रीही कर्तव्य बजावत आहेत. परंतु गुरे पकडण्यासाठी एक दोन नव्हे तर चार वेळा निविदा मागवून देखील एकही संस्था पुढे आली नाही. त्यामुळे स्थानिक संस्था किंवा गोशाळांनी यासाठी पुढे यावे, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आवाहन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg