loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरतर ग्रामस्थांचा खरवते महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा; आठवड्यात वीज समस्या सोडविण्याचे आश्वासन

रत्नागिरी जिल्ह्यातील साखरतर गावात गेल्या अनेक महिन्यांपासून दररोज १० ते १२ तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी खरवते महावितरण विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढला. वारंवार तक्रारी करूनही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांनी विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा देत, जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी खरवते विभागाचे विभागीय अधिकारी श्री. पवार यांनी ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. अवघ्या पाच दिवसांपूर्वीच त्यांनी या विभागाचा कार्यभार स्वीकारला असून, साखरतर गावातील वीज समस्येची गांभीर्याने दखल घेत एका आठवड्याच्या आत समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

टाइम्स स्पेशल

मोर्च्यानंतर श्री. पवार स्वतः ग्रामस्थांसमवेत साखरतर गावात आले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी जाणून घेतल्या तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. महावितरणच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र, दिलेल्या मुदतीत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg