loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगरपरिषद निवडणूक : महायुती विरुद्ध महाविकास आघाडीची थेट टक्कर

खेड – खेड नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगू लागली असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी झालेल्या घडामोडींमुळे संपूर्ण निवडणूकचित्रच बदलले आहे. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरपरिषदेसाठी एकूण 90 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी छाननीदरम्यान 21 अर्ज अवैध ठरल्यानंतर 69 उमेदवार रिंगणात उरले होते. मात्र अंतिम दिवशी 19 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने अखेर 65 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले आहेत. नगराध्यक्ष पदासाठीही अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेमुळे मोठा उलटफेर घडला आहे. सुरुवातीला एकूण आठ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी तीन अर्ज छाननीत बाद झाले व पाच उमेदवार स्पर्धेत उरले होते. मात्र अंतिम क्षणी वैभवी वैभव खेडेकर आणि तेजल प्रेमळ चिखले यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता केवळ तीन उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आहेत. यामध्ये शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या माधवी राजेश बुटाला, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सपना ऋषिकेश कानडे आणि वंचित बहुजन आघाडीच्या सीमा नितीन जाधव या तीन महिला उमेदवारांमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे ‘महा’ विरुद्ध ‘महा’ अशी होणारी लढत. खेड शहरात भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीने एकजूट दाखवत अधिकृतरीत्या एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर भाजपकडून आणि अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या काही उमेदवारांनीही पक्षनिष्ठेला प्राधान्य देत उमेदवारी मागे घेतली. परिणामी ही लढत थेट महाल्युती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळसरळ होणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत जरी तीन उमेदवार मैदानात असले तरी मुख्य लढत माधवी बुटाला आणि सपना कानडे यांच्यातच रंगणार असल्याच्या चर्चा जोर पकडत आहेत. दोन्हीही गटांचे नेते व कार्यकर्ते जोरदार प्रचाराला सज्ज झाले असून संवादसभा, घरदार संपर्क आणि सोशल मीडिया मोहिमा वेगात सुरू झाल्या आहेत. मात्र या दोघींच्या संघर्षात तिसऱ्या उमेदवाराप्रमाणे सीमा नितीन जाधव अनपेक्षितरीत्या आघाडी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. “दोघींच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ” ही म्हण या तिरंगी लढतीत लागू पडू शकते, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.

टाइम्स स्पेशल

खेड नगरपरिषद निवडणुकीचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून सर्वच पक्षांनी आपापले राजकीय समीकरणे मजबूत करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीची एकजूट, महाविकास आघाडीची आक्रमक रणनीती आणि तिरंगी नगराध्यक्ष निवडणूक हे तिन्ही घटक या निवडणुकीला अधिक रंगतदार बनवत आहेत. आगामी काही दिवसांत प्रचाराची झुंज अधिकच तीव्र होणार असून खेडकर मतदार कोणाला कौल देतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg