loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद शिक्षकांवरील बीएलओ कामाचा भार हटविण्याची मनविसेची मागणी

वरवेली (गणेश किर्वे) - महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे गुहागर तालुकाध्यक्ष प्रथमेश प्रदीप रायकर यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांच्या मार्गदर्शना खाली रत्नागिरी जिल्हाधिकारी तसेच गुहागर गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे यांना निवेदन देऊन जिल्हा परिषद शिक्षकांवर लादण्यात आलेले बी.एल.ओ.चे काम तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असतानाच त्यांच्यावर बीएलओसह विविध अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त भार टाकला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर गंभीर परिणाम होत असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिक्षणाचा मूलभूत हक्क अबाधित ठेवण्यासाठी शिक्षकांना पूर्णवेळ अध्यापनासाठी मुक्त करणे आवश्यक असल्याचे मनविसेने नमूद केले. तसेच, निवडणुकीसंबंधी बीएलओची कामे करण्यासाठी इतर विभागातील कर्मचारी किंवा सुशिक्षित बेरोजगार युवकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. शासनाने याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला.

टाईम्स स्पेशल

यावेळी प्रथमेश रायकर यांच्यासह मनविसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका सचिव प्रशांत साटले, उपतालुका अध्यक्ष अमित खांडेकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून तात्काळ मुक्त करण्याची मागणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg