loader
Breaking News
Breaking News
Foto

पुण्यातील उत्कर्ष भारत सन्मान सोहळ्यात विराज साळवी यांचा 'लोकहितार्थ उत्कर्ष सन्मान पुरस्कार' देऊन गौरव

पुणे : आसरा सोशल फाउंडेशन, पुणे व ओम पब्लिकेशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "उत्कर्ष भारत सन्मान सोहळा – २०२६" या भव्य पुरस्कार वितरण समारंभात रत्नागिरी येथील विराज महेंद्र साळवी यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन "लोकहितार्थ उत्कर्ष सन्मान पुरस्कार" प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी विराज महेंद्र साळवी यांचा लोकमान्य पगडी, शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सोहळ्याला आसरा सोशल फाउंडेशन, पुणेचे अध्यक्ष, ओम पब्लिकेशन, महाराष्ट्रचे संचालक, ज्येष्ठ सुप्रसिद्ध अभिनेते विजय गोखले तसेच ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी विराज साळवी यांच्या समाजहिताच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

समाजहित, जनजागृती, आरोग्य मार्गदर्शन व विविध सामाजिक उपक्रमांमधील सातत्यपूर्ण योगदानाबद्दल विराज महेंद्र साळवी यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार व हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg