loader
Breaking News
Breaking News
Foto

नेमळे एरंडवाक वाडी येथे महामार्गावर अज्ञात इसमाने सोडली ५ गुरे; वाहतुकीस अडथळा, लावणी पिकांचे नुकसान

नेमळे(प्रतिनिधी)- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नेमळे एरंडवाक वाडी येथे आज एका अज्ञात इसमाने एक गाय आणि चार बैल आणून सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. महामार्गावर अचानक सोडण्यात आलेल्या या गुरांमुळे वाहनधारकांना मोठा अडथळा निर्माण होत असून, परिसरातील शेतकर्‍यांच्या लावणी पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सध्या टेम्पो किंवा इतर वाहनांतून गुरांची वाहतूक करण्यास कायदेशीर बंदी आहे. त्यामुळे गुरांची विल्हेवाट लावण्यासाठी किंवा त्यांना सांभाळणे टाळण्यासाठी अज्ञात व्यक्तींकडून अशा प्रकारे कोणत्याही गावात किंवा थेट महामार्गावर गुरे आणून सोडून देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. आज नेमळे एरंडवाक वाडी परिसरात सोडण्यात आलेली ही ५ गुरे थेट महामार्गावर येत असल्याने वेगाने जाणार्‍या वाहनांना अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुसरीकडे, सध्या भात लावणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून शेतात नुकतीच लावणी पूर्ण झाली आहे. ही गुरे थेट शेतांमध्ये घुसून लावणी पिकाची तुडव आणि नासधूस करत असल्याने परिसरातील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकर्‍यांमधून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. संबंधित पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन महामार्गावर बेकायदेशीरपणे गुरे सोडून जाणार्‍या अज्ञात इसमाचा शोध घ्यावा, तसेच या गुरांचा तातडीने बंदोबस्त करून शेतकरी व वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी नेमळे ग्रामस्थांकडून केली जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg