loader
Breaking News
Breaking News
Foto

सरकारी जागेत राहणार्‍या नागरिकांना त्या जागेचे स्वामीत्व देणार-महसूलमंत्री नामदार बावनकुळे

रत्नागिरी (टाइम्स डिजीटल डेस्क)- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसांच्या रत्नागिरी जिल्हा दौर्‍यावर आले असून, या दौर्‍यात ते महसूल विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत आहेत. जिल्ह्यातील विविध प्रशासकीय बैठका, महसूल योजनांची अंमलबजावणी आणि स्थानिक विकासकामांचा आढावा घेण्यासह विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहत आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासन गतीमान करण्याची प्रक्रिया सरकार राबवित आहे. सर्वसामान्य नागरिकापर्यंत विकास पोहोचविण्याचा प्रयत्न शासनाचा आहे. सरकारी जागेत राहणार्‍या नागरिकांना त्या जागेचे स्वामित्व देण्याचा प्रयत्न आहे असे राज्याचे महसूल मंत्री नामदार बावनकुळे यांनी येथे बोलताना सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रमात नामदार बावनकुळे बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पुढे मोजणी केल्याशिवाय नोंदणी होणार नाही. मोजणी नंतरच अंमल केले जाईल तसेच जनतेला आता एकच प्रॉपटीर्र् कार्ड देणार आहोत. महाराष्ट्र शासनाने बिनशेती रद्द केली आहे. महसूल विभागामार्फत येत्या दोन वर्षात सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रशासन पोहाचणार असल्याचे नामदार बावनकुळे यांनी येथे बोलताना सांगितले. स्वातंत्रवीर सावरकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, भाजपा नेते प्रसाद लाड, चिपळूणचे आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, आमदार प्रमोद जठार, आमदार विक्रांत पाटील, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जि.प. अध्यक्षा अस्मिता केंद्रे, भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, मुख्यकार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg