loader
Breaking News
Breaking News
Foto

धनगर समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेचा अभिमान असणार्‍या गजनृत्याला शासकीय मान्यता द्या, समाज बांधवांची मांगणी

खेड - शेकडो वर्षांची परंपरा, आपल्या पूर्वजांच्या संस्कृतीचा वारसा आणि धनगर समाजाच्या अस्मितेचे जिवंत प्रतीक असलेल्या ‘धनगर गजनृत्य’ या पारंपरिक लोककलेला महाराष्ट्र शासनाने अधिकृत शासकीय मान्यता द्यावी, अशी जोरदार मागणी कोकण धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबई यांच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही केवळ एक कला नाही; हा आपल्या पूर्वजांनी जपलेला इतिहास आहे, आपल्या संस्कृतीची ओळख आहे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आपली सामूहिक जबाबदारी आहे. धार्मिक उत्सव, जत्रा, यात्रा, सांस्कृतिक महोत्सव आणि पारंपरिक कार्यक्रमांमध्ये धनगर समाजातील कलाकार मोठ्या अभिमानाने हे नृत्य सादर करतात. आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाची समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक वैभव संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडणार्‍या या कलाकारांना शासनाचे पाठबळ मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शासनाकडे प्रमुख मागण्या ‘धनगर गजानृत्या’ची अधिकृत नोंदणी करून पारंपरिक लोककलेचा शासकीय दर्जा द्यावा. धनगर गजानृत्य पथकांची अधिकृत नोंदणी करावी. शासकीय सांस्कृतिक कार्यक्रम व महोत्सवांमध्ये या कलेला नियमित स्थान द्यावे. कलाकारांना योग्य मानधन व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे. पारंपरिक वाद्यसामग्री व पोशाखासाठी विशेष अनुदान द्यावे. ज्येष्ठ लोककलावंतांचा सन्मान करून त्यांना मानधन द्यावे. नवोदित कलाकारांसाठी प्रशिक्षण शिबिरे व कार्यशाळा आयोजित कराव्यात. राज्य व राष्ट्रीय पर्यटन महोत्सवांमध्ये ‘धनगर गजानृत्या’चा समावेश करावा. शाळा-महाविद्यालयांमध्ये या लोककलेची ओळख करून द्यावी. या कलेचे दस्तऐवजीकरण, संशोधन व संवर्धनासाठी विशेष प्रकल्प राबवावा. प्रत्येक जिल्ह्यात ‘धनगर गजानृत्य महोत्सव’ आयोजित करण्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी. उत्कृष्ट कलाकार व पथकांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे.

टाईम्स स्पेशल

धनगर समाजाची ही पारंपरिक कला केवळ एका समाजापुरती मर्यादित नसून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. त्यामुळे या कलेला शासनाची अधिकृत मान्यता, संरक्षण आणि प्रोत्साहन मिळणे ही काळाची गरज आहे. धनगर समाजाच्या गौरवशाली परंपरेचे प्रतीक असलेल्या ‘धनगर गजानृत्या’ला शासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी शासनाने सकारात्मक आणि तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी कोकण धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबईचे राजापूर तालुका अध्यक्ष पांडुरंग गोरे यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg