loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ.विनय नातू यांची शृंगारपूर ग्रामपंचायतला सदिच्छा भेट

मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- दिनांक १ नोव्हेंबर १९७६ ला युवराज संभाजी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाने शृंगारपूर होळीचे सुभेदार म्हणून शृंगारपुरात दाखल झाले. त्यांच्या आगमनाला येत्या १ नोव्हेंबरला ३५० वर्षे होत असून त्याचे उत्कृष्ट नियोजन करून युवराज संभाजी राजे शृंगारपूर प्रभावळीचे सुभेदार आगमनाचा ३५० वा आगमन सोहळा शृंगारपुरात दिमाखात साजरा केला जावा, असे आवाहन सिंधूरत्न समृद्ध योजना २.०० चे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी ग्रामपंचायत शृंगारपूरच्या छत्रपती संभाजी राजे व महाराणी येसूबाई सभागृहात केले. शृंगारपूर ग्रामपंचायतीला दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी ते बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शृंगारपूरचे सरपंच विनोद पवार ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील, ग्रामस्थ व सदस्य, माजी जि. प. सदस्य दीपक जाधव, श्रीरंग कुंभार, दिलीप बडद, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर आदी मान्यवर उपस्थित होते. श्री सखी राज्ञी जयंती महाराणी येसूबाई भोसले यांचे जन्मस्थळ शृंगारपूर येथे १ एकर जागेचे संपादन छत्रपती संभाजी स्मारक आराखड्यात समाविष्ट असून ते विकसित करण्याचा समावेश आराखड्यात असल्याची माहिती देताना ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी गावाचा त्या अनुषंगाने पर्यटकांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ.विनय नातू यांनी या भेटी प्रसंगी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg