loader
Breaking News
Breaking News
Foto

दीपक कदम यांना ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ पुरस्कार जाहीर

खेड - तालुक्यातील देवघर-सोंडे ग्रामपंचायत अधिकारी दीपक तुकाराम कदम यांना शासनाचा २०२४-२०२५ वर्षाकरिता आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रशासकीय कौशल्याने आणि सामाजिक बांधिलकीतून गावच्या विकासात दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल ते पुरस्कारासाठी पात्र ठरले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या २० वर्षाच्या कार्यकाळात देवघर-सोंडे येथे १४ वर्षापासून कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत अधिकारी दीपक कदम यांनी पर्यावरण संवर्धनासाठी माझी वसुंधरा ५.० अंतर्गत विशेष पुढाकार घेतला. ग्रामस्थांचा आर्थिक उत्कर्ष साधण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांनी बांबू शेवगा लागवडीबाबत व्यापक जनजागृती करत प्रत्यक्ष लागवड उपक्रम राबवले.

टाईम्स स्पेशल

पर्यावरण सेवा योजना आणि स्वच्छता अभियानातंर्गत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांनी पथनाट्ये, वारकरी मंडळाचा सहभाग आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यावर भर दिला. ग्रामपंचायत अधिकारी म्हणून शासकीय योजनांचे लाम शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. पाणी पुरवठा डिजिटल सेवा आणि पायाभूत सुविधांचा विकास यावर त्यांचा कायम भर राहिला आहे. याच लोकाभिमुख, प्रशासकीय शिस्तीसह ग्रामविकासातील सातत्याची दखल घेवून त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg