loader
Breaking News
Breaking News
Foto

आम्हाला कॉकरोच म्हटल्याबद्दल सरन्यायाधीशांचे आभार: दीपके

नवी दिल्ली, : प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी अभिजीत दीपके यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे आभार मानले आहेत. जर तुम्ही आम्हाला कॉकरोच म्हटले नसते, तर तरुण रस्त्यावर उतरले नसते. प्रधान यांनी राजीनामा दिला नसता.A आम्ही कॉकरोच आहोत. एकदा घुसलो की, सहजासहजी बाहेर पडत नाही. अजून फक्त एक राजीनामा झाला आहे. कोणी कोकरोचशी पंगा घेऊ नका, असेही त्याने म्हटले आहे. खरं तर, ही संपूर्ण कहाणी ७२ दिवसांपूर्वी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या तोंडी टिप्पणीने सुरू झाली होती. १५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश यांचे खंडपीठ एका वकिलाच्या याचिकेवर सुनावणी करत होते. याच दरम्यान त्यांनी म्हटले होते- काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, जे नंतर मीडिया, सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करू लागतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

झुरळांच्या टिप्पणीनेच नकळतपणे या आंदोलनाला त्याची ओळख देणारे प्रतीक दिले होते. विरोधाची खिल्ली उडवण्यासाठी वापरलेला शब्द विद्यार्थ्यांनी स्वीकारला. सोशल मीडियावर झुरळांच्या इमोजींचा पूर आला, रातोरात मीम्स तयार झाले, कलाकारांनी व्यंगचित्रे काढली आणि कॅम्पसमध्ये उपहासात्मक पोस्टर्स फिरू लागली. दीपके यांनी या अपमानाचे रूपांतर ‘कॉकरोच जनता पार्टी’मध्ये केले, जी सुरुवातीला एक उपहासात्मक सोशल मीडिया पेज म्हणून सुरू झाली होती आणि नंतर विद्यार्थी आंदोलनाचा चेहरा बनली. जेव्हा त्याचे एक सोशल मीडिया अकाउंट हटवले गेले, तेव्हा ते कॉकरोच इज बॅक या नावाने दुसर्‍या अकाउंटसह परत आले, ज्याची टॅगलाइन होती - कॉकरोच कधीच मरत नाहीत. भूतकाळातील अनेक विद्यार्थी आंदोलनांच्या विपरीत, याने रस्त्यावर उतरण्यापूर्वी ऑनलाइन जोर पकडला. सीजपी वेगाने देशातील सर्वात मोठ्या डिजिटल समुदायांपैकी एक बनले. आज सीजेपीच्या इंस्टाग्रामवर सुमारे २.६३ कोटी (२६.३ दशलक्ष) फॉलोअर्स आहेत, तर कॉंग्रेसचे सुमारे १.४८ कोटी (१४.८ दशलक्ष) आणि भाजपचे ९५ लाख (९.५ दशलक्ष) फॉलोअर्स आहेत. सरन्यायाधीशांचे विधान समोर आल्यावर त्याचा विरोध होऊ लागला. नेते, लोक आणि सोशल मीडियावर या विधानावर टीका होऊ लागली.

टाइम्स स्पेशल

दुसर्‍याच दिवशी म्हणजेच १६ मे रोजी उगख सूर्यकांत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जबलपूरला पोहोचले. तेथे त्यांनी झुरळांच्या टिप्पणीवर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, मी देशातील तरुणांवर टीका केली, हे म्हणणे पूर्णपणे निराधार आहे. एका किरकोळ प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान माझ्या तोंडी टिप्पण्यांना माध्यमांच्या एका भागाने चुकीच्या पद्धतीने सादर केले, हे वाचून दुःख झाले. मी अशा लोकांवर टीका केली होती, जे बनावट आणि खोट्या पदव्या घेऊन कायदेशीर व्यवसायात आले होते. पण प्रकरण खूप पुढे गेले होते. १६ मे रोजी रात्री १२ वाजता अभिजीत दीपके यांनी कॉकरोच जनता पार्टी नावाचे सोशल मीडिया पेज तयार केले. त्या दिवसापासून २५ जुलैपर्यंत म्हणजेच सुमारे ७२ दिवसांत, या वक्तव्यानंतर तयार झालेली सीजपी देशात सर्वाधिक चर्चेत राहिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg