loader
Breaking News
Breaking News
Foto

कॉकरोच जनता पार्टीची थेट धमकी, अन्यथा पुन्हा आंदोलन करू. सरकारला वचननामा पाळण्याचा इशारा

नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीच्या इशारानंतर राजधानी दिल्लीमध्ये हजारोंच्या संख्येने देशभरातून युवक एकत्र आले. आंदोलन आणि शेवटपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली, राजीनामा मान्य झाला आणि आंदोलन ही संपले. मात्र आता याच कॉक्रोरोच जनता पार्टीने सरकारला इशारा दिलाय.जंतर-मंतर मैदानावर युवकांचे आंदोलन सुरू असताना काँग्रेस पक्षाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थान समोरच आंदोलन केले. त्यानंतर आंदोलन अधिकच चिघळण्याची स्थिती निर्माण झाली. 20 जुलै रोजी संसदेवर विद्यार्थ्यांचा मोर्चा निघणार अशी घोषणा अगोदरच सोनम वांगचुक यांनी केली होती. ठरलेल्या दिवसाला देशभरातून हजारोंच्या संख्येत विद्यार्थी एकत्र आले आणि संसदेच्या दिशेने विद्यार्थ्यांनी मार्च सुरू केला या मार्चला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना अटकाव करावा लागला अन्यथा मोठा बाका प्रसंग घडला असणे शक्य होते असे जाणकारांचे मत आहे. आज एक पत्रकार परिषद घेण्यात आली .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्ना सिंह यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर कुठे-कुठे गुन्हे दाखल झाले याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, 31 जुलैपासून आम्ही सर्व वकिलांच्या संपर्कात आहोत. ज्यांना ताब्यात घेतलं गेलं त्यांना बाहेर काढण्याचं काम करत आहोत. आसाममध्ये 7-8 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. वकिल मदत करत आहे. एका वकिलाही अटक करण्यात आली आहे. कोलकात्यात 11 जणांना अटक केली आहे. त्यात 10 मुस्लिम आहेत. यावरून एका कम्युनिटीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.पुढे बोलताना रत्ना सिंह यांनी सांगितले की, ‘बिहारमधून सर्वाधिक माहिती येत आहे. बिहारमध्ये लिगल टीमची गरज आहे. एका व्यक्तीसाठी तीन वकील येत आहेत. त्यांच्यात समन्वय घडवायचा आहे. सीवान, पटना आणि छपरा या ठिकाणी विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल केले जात आहे. आमचं वकिलांना आवाहन आहे की तुम्हाला जशी मदत करायची आहे ती करावी.

टाइम्स स्पेशल

आता कॉकरोच जनता पार्टीने मोठी राजकीय खळबळ उडविली आहे. आंदोलकांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे ,त्यांना अटक केली जात आहे. विविध राज्यात विद्यार्थ्यांना अटक केली जात आहे, ही कारवाई त्वरित थांबली पाहिजे अन्यथा लोकशाही मार्गाने आम्हाला लढा उभारून लढावे लागेल. उद्यापर्यंत जर विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात आले नाही तर पुढे काय करायचे? त्याचा विचार केला जाईल, असा इशारा दिला आहे. बिहार आसाम आणि पश्चिम बंगाल मध्ये आंदोलकांना टार्गेट केले जात आहे, सरकारने विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात असल्याचे म्हटले होते मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. जर आंदोलकांवर येईल गुन्हे माघारी घेण्यात आले नाही तर आम्हाला विचार करावा लागेल असा इशाराच कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. सौरव दास यांनी याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. आंदोलकांवर गुन्हा दाखल न करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे. यावर बोलताना पार्टीचे प्रवक्ते आशुतोश रांका यांनी सांगितले की, ‘ मंत्री नड्डा यांनी भविष्यात कोणतीही तक्रार करणार नाही आणि कुणावरही गुन्हे दाखल केले जाणार नाहीत असं सांगितलं होतं. मंगळवारपर्यंत अॅग्रीमेंट देणार आहेत. लिखित अॅग्रीमेंट देणार आहेत, आम्ही सरकारची वाट पाहत आहोत. नड्डा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं आणि ट्विटही केलं होतं. सीनियर मंत्र्याने करार केला आहे. त्यामुळे आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जाणार नाही. गुन्हे मागे घेतील ही आशा आहे. उद्यापर्यंत लिखित अॅग्रीमेंट दिलं नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करू.’ असे म्हटलेय .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg