loader
Breaking News
Breaking News
Foto

‘संकल्प कलामंच’ने केला आगळ्या वेगळ्या कार्याचा ‘गुरु गौरव’ सन्मान

वेळणेश्वर(उमेश शिंदे)- समाजातील विविध क्षेत्रातील स्वयंप्रेरणेने कार्य करणार्‍या व्यक्तींचा शोध घेऊन ही आगळीवेगळी गुरुपूजा आहे असे आवर्जून मुंबई विद्यापीठ उपपरिसर रत्नागिरीचे संचालक डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी प्रतिपादन केले. व्यासपीठावरून डॉ कुलकर्णी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून क्रेडाईचे माजी अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक दिपक साळवी हे उपस्थित होते. सालाबादप्रमाणे या वर्षी ही संकल्प कला मंच ही नाट्य चळवळीतील अग्रगणी संस्था यांनी आपला हा ३३ वा गुरुपौर्णिमा निमित्त गुणवंताचा गुरु गौरव कार्यक्रम मारुती मंदिर येथील महिला मंडळाच्या सभागृहात आयोजित केला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

‘‘मी व्यवसायात अनेक व्यक्ती पहात आलो पण या कार्यक्रमामुळे उल्लेखनीय कार्य करणार्‍या अनेक व्यक्ती अनुभवता आल्या,’’ असे उदगार बाधकाम उद्योजक दिपक साळवी यांनी काढले. एकूण ३५ गुणवंताचा गुरु गौरव सन्मानपत्र व सन्मानचिन्ह आणि अविष्कार निर्मिती कागदी गुलाब पुष्प देवून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती तेली यांनी केले.

टाइम्स स्पेशल

या गुणगौरव कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष विनयराज उपरकर, उपाध्यक्षा रक्षिता पालव, उपाध्यक्ष चद्रकांत कांबळे, जनसंपर्क अधिकारी धनवंत कासेकर, खजिनदार कृष्णकांत साळवी, सदस्य नंदकुमार भारती, सल्लागार डॉ दिलीप पाखरे, आजी माजी अध्यक्ष विनोद वायंगणकर यांनी परीश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg