loader
Breaking News
Breaking News
Foto

तटकरे साहेबांवरील खोटे आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न थांबवा; वरिष्ठांनी कारवाई करावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादाम

मंडणगड (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर सवंग प्रसिध्दीकरिता चुकीचे आणि तथ्यहीन आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न काही व्यक्तींकडून केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांनी पत्रकारांनी दिलेल्या प्रतिक्रीयेत केला आहे. दरम्यान पार्टीचे वरिष्ठ पातळीवरील नेतृत्वाने अशा कार्यकर्त्याचे विरोधात कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, स्व. अजितदादांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून खासदार सुनील तटकरे यांनी पक्षाच्या स्थापनेपासून पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी पक्षाच्या विरोधात कोणताही गोंधळ निर्माण केल्याचे उदाहरण देता येणार नाही. त्यामुळे केवळ स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा पक्षात स्वतःला पुढे नेण्यासाठी खा.तटकरे यांच्यावर आरोप करणे योग्य नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रदेशाध्यक्ष म्हणून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला ४१ जागांवर मिळविलेले घवघवीत यश तसेच लोकसभा निवडणुकीत प्रतिकूल परिस्थितीतही विजयी केलेली आपली एक जागा निवडून आणण्यात खा.तटकरे यांची महत्त्वाची भूमिका आहे, संघटनात्मक पातळीवरही त्यांनी चांगले काम केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला यश मिळाले आहे. “कार्यकर्ता हा पक्षाशी बांधील असतो. आम्हाला अजितदादांवर आणि तटकरे साहेबांवर प्रेम व विश्वास आहे. पक्षाच्या स्थापनेपासून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. त्यामुळे पक्षात नव्याने आलेल्या व्यक्तींनी अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांवर बेछूट आरोप करणे योग्य नाही, मंडणगड तालुका प्रदेशाध्यक्ष व खासदार तटकरे यांच्या नेतृत्वावर ठाम असून, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ताही त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा मुकादम यांनी केला.

टाईम्स स्पेशल

पक्षांतर्गत आरोप-प्रत्यारोपांना आळा घालून पक्षाची शिस्त आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाने योग्य ती भूमिका घेईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी राज्यात महायुतीचे माध्यमातून सत्तेत असून जनतेची कामे उत्तमपणे करीत आहे. त्यांनी गुंगी गुंडिया म्हणण्याच्या कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे व्यक्तव्याचा मुकादम यांनी निषेध व्यक्त केला आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वार पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्त्यांचा विश्वास असल्याने पक्षाच्या मार्गक्रमण योग्य प्रकारे असल्याचे यावेळी सांगीतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg