loader
Breaking News
Breaking News
Foto

मत्स्य महाविद्यालयाचा ४५ वा वर्धापन दिन ४ ऑगस्ट रोजी दिमाखात साजरा

प्रतिनिधी (जमीर खलफे) : मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे व्यवसाय क्षेत्रातील मोठे योगदान आहे, गेल्या ४४ वर्षांमध्ये महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विविध मत्स्य संवर्धन, संशोधन, शासकीय क्षेत्रात कार्यरत असून मत्स्यसंवर्धना बरोबरच खाद्य, औषधे, विक्री, मत्स्यशेती यंत्र सामुग्री इ.; कंपन्यांमध्ये व्यवस्थापन क्षेत्रात मत्स्य पदवीधारकांना मोठी मागणी आहे. याच संधीचा वापर करून मत्स्य महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मोठा ठसा उमटवलेला आहे; या बद्दल मत्स्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. आपल्या पुढील मार्गदर्शनामध्ये डॉ. पावसे यांनी विद्यार्थ्याना महाविद्यालयाच्या उपलब्ध कोळंबी शेती प्रकल्प, प्रक्षेत्रे, प्रयोगशाळा आणि आद्ययावत पायाभूत सुविधांचा वापर करून ज्ञानानुभव मिळवावा असे विषद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते पटांगणात ध्वजारोहण करून तसेच परिषद दालनात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी आपल्या प्रास्ताविकात, डॉ. दबीर पठाण यांनी मत्स्य महाविद्यालय रत्नागिरी, हे भारतातील अग्रगण्य महाविद्यालय असल्याचे नमूद करून यातिल विद्यार्थी कठोर मेहनत घेऊन केंद्र सरकार, राज्य सरकार, खासगी क्षेत्र इ. ठिकाणी उच्च पदांवर सक्रिय कार्यरत असल्याचे विषद केले. वर्धापन दिनाचे औचित्य साधून यशस्वी माजी विद्यार्थ्यांची ‘थेट-भेट’ आजी विद्यार्थ्यांबरोबर केल्याबद्दल त्यांनी नी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी मत्स्य महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. विजय निंबाळकर, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी, मत्स्य जलशास्त्र व मत्स्य जीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. आसिफ पागारकर, मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान व मत्स्य विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. दबीर पठाण, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये, चे प्रभारी शास्त्रज्ञ डॉ. किरण मालशे, कृषी संशोधन केंद्र, शिरगांवचे प्रमुख डॉ. सोनोने आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

या महाविद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त व्यासपीठावरील यशस्वी माजी विद्यार्थ्यांचे सत्कार माजी अधिष्ठाता, डॉ. राघवेंद्र पै यांचे हस्ते करण्यात आला. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर दुपारच्या सत्रात सध्या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुणे डॉ. अजय नाखवा, प्रभारी वैज्ञानिक, आय.सी.ए.आर.,सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट, मुंबई; धनराज सिंग ठाकूर, संचालक एमटीए नेटवर्क (चीन); अक्षया मयेकर, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, मिरकरवाडा, रत्नागिरी यांचेबरोबर संवाद साधून “मत्स्य शास्त्रातील नोकरी, व्यवसाय व उद्योग संधी” याविषयावर ‘थेट संवाद’ साधून भविष्यातील संधी कोणत्या?... आणि त्याची तयारी कशी करावी? याबाबत विस्तृत माहिती व सखोल मार्गदर्शन घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg