loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडीतील करुळ गावठण येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या सदानंद कदम यांचा मृतदेह ४ किलोमीटर अंतरावर नदीपात्रात सापडला

वैभववाडी (प्रतिनिधी) - करूळ गावठण ब येथील शेतकरी सदानंद हरिश्चंद्र कदम (वय ७०) हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. कामानिमित्त शेतात जात असताना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे करूळ परिसरासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सदानंद कदम हे सकाळी घरातून खत व कोयता घेऊन आपल्या शेतात जात होते. घरापासून काही अंतरावर नदीकाठाजवळ त्यांचा पाय पसरला. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ते पुराच्या प्रवाहात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच महसूल विभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून नदीपात्रात युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. करूळ गावातील सह्याद्री जीव रक्षक टीमचे सुमारे ४० युवक सदानंद कदम यांचा शोध घेण्यासाठी नदीपात्रात उतरले होते. नदीतील पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदानंद हरिश्चंद्र कदम यांचा मृतदेह घटनास्थळापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर नदीपात्रातील झुडपामध्ये सापडून आला. करूळ एडगाव सीमेजवळ जांभळीचा माळ या ठिकाणी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास तब्बल आठ तासाने सापडून आला. सकाळी नऊ वाजल्यापासून सह्याद्री जीव रक्षक टीमचे हेमंत पाटील, नरेंद्र कोलते, राजेंद्र वारंग, विजय सावंत, अमर शिंदे, रवींद्र चव्हाण, रघुनाथ चव्हाण, आनंद शिंदे, सत्यवान सरफरे संजय कदम, पांडुरंग शिवगण, सत्यविजय मोरे, विजय पवार, तुकाराम पवार, मंगेश शिवगण, हिंदुराव पाटील, सचिन पाटील, सुरज शिंदे शोधकार्य सुरू होते. करूळ ग्रामस्थ आणि सह्याद्री जीवन रक्षक यांच्या अथक प्रयत्नांना आठ तासाने यश मिळून आले आहे. मयत सदानंद कदम हे सकाळी शेतीच्या कामाला जात असताना करूळ नदीत पाय घसरून तोल जाऊन नदीच्या प्रवाहात वाहत गेले.

टाईम्स स्पेशल

याबाबत प्रशासनाला माहिती मिळताच तहसीलदार सूर्यकांत पाटील, नायब तहसीलदार दिलीप पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, वैभववाडी सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, जि. प. सदस्य मनोज रावराणे, श्रावणी रावराणे, बंड्या मांजरेकर, पं.स. सदस्य सुवर्णा संसारे, मंगेश लोके, सरपंच नरेंद्र कोलते, माजी सरपंच हिंदूराव पाटील, अरुण कदम, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब कोलते, पोलीस पाटील उदय कदम व सचिन पाटील, मंडळ अधिकारी गवस, तलाठी शुभांगी साबळे, ग्रामसेवक शशिकांत गुरव, पोलीस अधिकारी फक्रुद्दीन आगा, पोलीस हवालदार सी.ए.माने, आर.बी.तळस्कर, मोहन राणे, जितेंद्र कोलते, संदीप राठोड उपस्थित होते. सदानंद कदम हे करूळ गावचे प्रसिद्ध व्यापारी होते तसेच ते उत्तम शेतकरी होते. अनेक वर्षे ते शेतीबरोबर व्यवसाय करत असत त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुलगे, भाऊ, भावजय, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg