loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबोली पर्यटनस्थळावर पोलिसांनी सरकारी सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी

आंबोली, : आंबोली पर्यटन स्थळावरील सुरक्षेसाठी पोलिसांनी सुरक्षा रक्षक नेमावे अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी पोलिसांकडे केली आहे. आंबोली पर्यटन स्थळावर पर्यटक अपघात घडण्याचे प्रकार बर्‍याचदा घडतात. बर्‍याचवेळा आणखी अनुचित प्रकार होतात. कुटुंबिक पर्यटक तसेच कपल तसेच अन्य पर्यटक यांना सुरक्षा वाटावी. यासाठी पोलिसांनी सरकारी सुरक्षा रक्षक नेमण्याची आवश्यकता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आंबोली हा दुर्गम भाग आहे आणि पॉईंट हे वस्ती पासून लांब आहेत त्यामुळे देखरेख राहत नाही. इतर ठिकाणी जवळपास वस्ती असते आणि रेलचेल असते. अनेक ठिकाणी सुरक्षारक्षक असतात. स्पीकर घेऊन आवश्यक सूचना देतात. काही प्रसिद्ध मंदिरात देखील स्पीकर वर आवश्यक सूचना देतात. ज्या ठिकाणी गर्दी असते तेथे अशा सूचना असतात.

टाईम्स स्पेशल

आंबोलीत कावळेसाद महादेवगड येथे अशा सुरक्षा रक्षकांची गरज आहे. त्यामुळे अनुचित प्रकार रोखण्याबरोबर पर्यटकामध्ये कौटुंबिक आणि महिला पर्यटकामध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी, यासाठी धोकादायक पॉईंटवर सुरक्षा रक्षक नेमावे, अशी मागणी येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन हवालदार लक्ष्मण काळे आणि एस.बी.गलोले यांच्याकडे दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg