loader
Breaking News
Breaking News
Foto

पद्मश्री डी. वाय. पाटील यांचं निधन, वयाच्या 90 व्या वर्षी कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज निधन झाले आहे. कोल्हापूरमध्ये वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. डी. वाय. पाटील यांनी अनेक राज्यात त्यांनी शैक्षणिक संस्था स्थापना करत शिक्षणाची ज्ञानगंगा गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी खुली केली. त्यांच्या राजकीय-सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केले. काँग्रेसचे दिग्गज नेते सतेज पाटील यांचे ते वडील होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. डी. वाय. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कसबा बावडा येथील यशवंत निवास या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्ययात्रा सुरू होणार आहे. कसबा बावडा येथील डी. वाय.पाटील मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.डी.वाय. पाटील १९५७ ते १९६२ दरम्यान कोल्हापूर शहराचे महापौर होते. १९६७ व १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले होते. डी. वाय. पाटील यांनी संस्था उभारणीतून नागरीक घडतात, समाजाची उभारणी होते, या धोरणातून राज्यात शैक्षणिक संस्थांचा विस्तार केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg