loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबोली धबधब्याच्या पावतीवर अजूनही ’उपद्रव शुल्क’, काँग्रेसचा संताप; एक आठवड्यात मजकूर न बदलल्यास ’उपद्रवी प्रशासन’ बोर्ड लावणार; काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांचा इशारा

सिंधुदुर्ग, - आंबोली येथील मुख्य धबधब्यावर रविवारी कर्नाटक येथील पर्यटकाचा झालेला मृत्यू वेदनादायक असतानाही वनविभाकडून दिल्या जाणार्‍या पावतीवर ’धबधबा पर्यटन उपद्रव शुल्क रु. २०’ हाच मजकूर अजूनही छापला जात असल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केला आहे. मुख्य धबधब्याजवळ दिवसभरात हजारो पर्यटक येतात. प्रत्येक नागरिकाकडून २० रुपयांची पावती देऊन शुल्क घेतले जाते. मात्र या पावतीवर वनविभाग सावंतवाडी - धबधबा पर्यटन उपद्रव शुल्क’ असे बेजबाबदार शब्द छापील स्वरूपात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मोंडकर म्हणाले, सुविधांसाठी शुल्क घेण्यास आमचा विरोध नाही. परंतु पावसाळी पर्यटनासाठी जगभरातून येणार्‍या नागरिकांच्या भावनेची प्रशासन पावतीवरील मजकुरातून चेष्टा करत आहे. लाखो रुपयांचा कर जमा होतो मग पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? अलिकडेच झालेल्या दुर्घटनेनंतरही प्रशासनाची बेफिकीर वृत्ती दिसून येते. मृत व्यक्तीच्या कुटुंबाला प्रशासनाने ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

टाईम्स स्पेशल

प्रशासनाला जर थोडी तरी लाज असेल तर पावतीवरील मजकूर आठवडाभरात हटवावा. अन्यथा वनमंत्री आणि जिल्हा प्रशासन यांचा उपद्रव मंत्री, उपद्रवी प्रशासन’ असा बोर्ड लावू, असा इशारा अरविंद मोंडकर यांनी दिला. आंबोली हे जिल्ह्याचे पावसाळी आकर्षण आहे. येथे सुविधा देण्याऐवजी ’उपद्रव’ हा शब्द वापरणे म्हणजे नागरिकांप्रती असलेली कर्तव्याबतची बेफिकीर भूमिका असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg